Posts

Showing posts from September, 2018

सुरेशचंद्र म्हात्रे सर

Image
२३ सप्टेंबर, म्हात्रे सरांचा जन्म वाढदिवस. म्हात्रे सरांना शुभेच्छा नेमक्या कशा स्वरूपात द्याव्यात हाच माज्यापुढे पडलेला प्रश्न आहे कारण मला त्यांची आदरयुक्त अपार भीती वाटते. सरांसोबत संवाद साधताना आपण प्रत्यक्ष ग्रंथालयासोबत चर्चा करत असल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. माझा मामेभाऊ महेश आणि मी सर्वप्रथम अंगारमळ्यात ३ सप्टेंबर २०१७ रोजी गेलो होतो. प्रशिक्षण शिबिरात फेरफटका मारत असताना म्हात्रे सरांसोबत भेट झाली त्यांनी आमची प्रेमाने चौकशी केली आणि संवाद  साधताना मी  सहजपणे बोलण्याच्या ओघात मी एका व्यक्तीचं नाव घेऊन विचारलं की यांनी संघटना का सोडली? त्यानंतर सरांची मुद्रा अचानक बदलली आणि मला उत्तरले की हा प्रश्न तू त्या व्यक्तीला जाऊन विचारला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर मी कसा देऊ शकतो? मग मी अचानक भानावर आलो की मी किती उथळ प्रश्न विचारला आणि मला पूर्ण  दिवसभर चुकल्या सारखं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सर व्याख्यानमालेत भेटले आणि पुन्हा त्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. तेव्हा मात्र मनावरील साचलेलं भीतीचं मळभ नकळत हलकं झालं. म्हात्रे सरांचं संघटनेच्या सर्व पाईकांवर बारकाईने लक्ष ह

तुमचे धोरण, हेच आमचे मरण...

१९८६ साली यवतमाळच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्येचं पाऊल उचललं आणि संपूर्ण देश "हादरून गेला" असं प्रसार माध्यमे म्हणतात! भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न समाजासमोर यायला ३९ वर्षानंतर एका कुटुंबाचा अंत पाहावा लागत असेल तर ही देशासाठी नक्कीच लांच्छनास्पद गोष्ट आहे. आत्महत्येसारखे भीषण प्रकार वारंवार घडूनही शासन व्यवस्था काही केल्या जाग्या व्हायला तयार नाहीत. याउलट १९९० नंतर म्हणजेच विशेषतः जागतिक उदारीकरण अवलंबिले गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली तसेच शेतकरी दारूच्या व्यसनासाठी आणि मुलांच्या लग्नकार्यासाठी कर्जबाजारी बनतो अशा प्रकारच्या खोट्या आवई सुद्धा काही लबाड लोकांनी प्रसारमध्यमातील संपादकीय रकाने भरवून केली. इंडिया आणि भारत या दोन समाजव्यवस्था दुरावण्यासाठी इथूनच सुरुवात झाली. इंडियाने शोषकाचा अवतार धारण केला आणि भारत मात्र शोषित बनून आजन्म पिचत राहिला. आमचं मायबाप असलेलं शासन आम्हाला का पोसत नाही? प्रत्येकवेळी सावत्रपणाने का वागवत आहे? हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला यक्ष प्रश्न आहे. देशाला स्वातंत्र्य